
(विशेष प्रतिनिधी):NEET परीक्षा घोटाळ्यामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले असून, या अन्यायाविरोधात आता वडवणी शहर पूर्ण ताकदीने एकवटले आहे. दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आणि संसदेवर निघणाऱ्या ‘जन आक्रोश मोर्चा’ला वडवणीकरांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.या
घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी आता वडवणीतून केली जात आहे.📢
महत्त्वाचे हायलाइट्सघोटाळ्याचा फटका: वडवणीची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी पवार हिच्यावर NEET परीक्षा घोटाळ्यामुळे अन्याय झाल्याचा आरोप.प्रमुख मागणी: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी वडवणीकर आक्रमक.आंदोलनाची हाक: वडवणी शहरात भव्य ‘मशाल रॅली’चे आयोजन.
वडवणीची लेक ‘ज्ञानेश्वरी पवार’च्या न्यायासाठी लढाNEET परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वडवणीची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी पवार हिच्यावरही या परीक्षा घोटाळ्यामुळे मोठा अन्याय झाला आहे. हा प्रश्न केवळ एका विद्यार्थिनीचा नसून, देशातील आणि प्रत्येक सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळ खंडोबा करणारा आहे. त्यामुळे या अन्यायाविरुद्ध आता शांत न बसता रस्त्यावर उतरण्याचा निर्धार स्थानिक नागरिकांनी केला आहे.उद्या वडवणीत ‘मशाल रॅली’; नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहनया अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि दिल्लीतील आंदोलनाला बळ देण्यासाठी उद्या संध्याकाळी वडवणी शहरात एका भव्य ‘मशाल रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या पूर्वतयारीसाठी आणि नियोजनासाठी वडवणीतील सर्व नागरिक, विद्यार्थी, पालक, आणि तरुण वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.”आज आवाज उठवला नाही, तर उद्या उशीर होईल!आपल्या
लेकरांच्या भविष्याचा आणि हक्काचा हा प्रश्न

